सोयाबीनच्या गंजीला आग लागुन एका लाखाचे नुकसान निंभा येथील घटना

0
909
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )-

चांदुर रेल्वे तालुक्यातील निंभा गावातल्या एका शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीनच्या गंजीला अज्ञात लोकांनी आग लावली. यामध्ये अंदाजे ५ एक्कर शेतातील उत्पन्न जळून खाक झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.
तालुक्यातील निंभा येथील शेतकरी लक्ष्मण तुकाराम पारवे (७२)  यांच्याकडे गावात शेती असुन जोडीला मांजरखेड येथील एकनाथ शेषरावजी राऊत यांचे निंभा गावातील शेत गट क्र. १०४, क्षेत्रफळ १ हेक्टर ८७ आर हे मक्त्याने केले होते. या मक्त्याच्या शेतात सोयाबीन व तुरचे पीक घेतले आहे. काही दिवसांपुर्वी सोयाबीनची सोंगणी करून त्याची गंजी घातली होती. या गंजीला नुकतीच रात्रीच्यावेळी अचानक आग लागली. या आगीत त्यांचे एका लाखाचे नुकसान झाल्यामुळे लक्ष्मणराव पारवे यांच्या पुढे जगण्याचं संकट उभ झाल आहे. सदर घटनेचा पंचनामा केला असुन तळेगाव पोलीस स्टेशनला याची नोंद करण्यात आली आहे.