लवकरच थांब्या मिळवुन देण्याचे दिले आश्वासन
चांदुर रेल्वे (अमरावती ) –
पूर्व व पश्चिम विदर्भातून पुण्याला जाणाऱ्यांची संख्या फार मोठी असल्याने काझीपेठ ते पुणे रेल्वेगाडी दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर सुरू झाली. मात्र या गाडीला चांदुर स्टेशनवर थांबा दिला नसल्यामुळे या गाडीला थांबा मिळवुन द्यावा या मागणीसाठी आज अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटना, चांदुर रेल्वे च्या पत्रकारांनी केंद्रीयमंत्री हंसराज जी अहिर यांची भेट घेतली व निवेदन दिले. यावर लवकरच थांबा मिळवुन देण्याचे आश्वासन हंसराजजी अहिर यांनी पत्रकारांना दिले.