चांदुर बाजार / बादल डकरे-
राज्य सरकारने थकबाकी असणाऱ्या शेतकरी यांची वीज कापण्याचे आदेश दिले असताना.चालू वीज जर भरली नाही तर वीज बिल कापणीला तालुक्यात सुरुवात ही झाली होती.या प्रहार संघटनेने आक्रमक पवित्रा घेऊन काल दिनांक 1 नोव्हेंबर ला चांदुर बाजार येथील उपकार्यकरी अभियंता याना निवेदन दिले आणि वीज कापणी केली तर प्रहार संघटना आक्रमक पवित्रही घेणार असल्याचे इशारा दिला.निवेदन देताना प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख श्री मंगेश देशमुख,पंचायत समिती सदस्य श्री अभिजित बोंडे,मनोज जैयस्वाल,राजेश सोलव, मुज्जफर हुसेन,रहेमान भाई,निलेश वाटणे इत्यादी प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते