भाजयुमोची समाजकल्याण कार्यालयावर धडक – 15 दिवसात विद्यार्थ्याच्या प्रलंबित शिष्यवृत्तीची प्रकरणे निकाली काढण्याची मागणी

0
608
Google search engine
Google search engine

अमरावती :-

समाजकल्याण विभागाकडून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या वाटपात गेल्या भरपूर दिवसापासून संथगती निर्माण झाली आहे. कॉलेजांनी विभागाकडे प्रस्ताव न देणे, शिष्यवृत्तीच्या प्रस्तावात कागदपत्रांची अपूर्तता यामुळे शिष्यवृत्तीचे हजारो प्रस्ताव धूळखात पडलेले आहे.

त्यामुळे हजारो विद्यार्थ्याची शिष्यवृत्तीची प्रलंबित प्रकरने 15 दिवसात निकाली लावावी व जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणांचा आकडा द्यावा या साठी आज भारतीय जनता युवा मोर्चा अमरावती जिल्हा तर्फे भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्री सोपान कनेरकर यांच्या नेतृत्वात समाजकल्याण कार्यालयावर धडक दिली.

यावेळी भाजयुमो जिल्हा सरचिटणीस श्री मुकेश कठाळे, सरचिटणीस आदित्य बिजवे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष श्री रवी मेटकर, भाजयुमो विद्यार्थी आघाडी प्रमुख धम्मराज नवले, भाजयुमो सोशल मीडिया प्रमुख कृणाल वेरुळकर, शाश्वत देशमुख, चेतन तितरे, वरदान इंगोले , एकणाथ गुजर व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.