बिडिओंना निवेदन देतांना ग्रामस्थ |
चांदूर रेल्वे / शहेजाद खान –
पंचायतराज व्यवस्थेमध्ये ग्रामसभेला अत्यंत महत्व आहे.असे असतांना चांदूर रेल्वे तालुक्यातील निमगव्हाण
येथील ग्रामपंचायतीने ग्रामसभेची मुनादी दिली.मात्र या सभेला चक्क सरपंचा,ग्रामसेविका व पं.स.अधिकाऱ्यांनी
दांडी मारली तर उपस्थित ग्रा.पं.सदस्यांनी हात वर केले.त्यामूळे निमगव्हाण येथील १ मे महाराष्ट्र दिनीआयोजित
ग्रामसभा झाली नाही.त्यामूळे संतप्त झालेल्या ग्रामावासीयांनी मंगळवारी गटविकास अधिकारी व तहसीलदार
यांना निवेदन देऊन सर्व ग्रा.पं.सदस्यांना अपात्र घोषीत करण्याची जोरदार मागणी केली आहे.
१ मे महाराष्ट्र दिनी निमगव्हाण येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.त्याकरीता निमगव्हाण ग्रा.पं.ने
गावात मुनादी देऊन ग्रामसभेची माहिती ग्रामस्थांना दिली.त्यामूळे गावातील सर्व ग्रामस्थ ग्रामसभेसाठी जमले.सर्व
ग्रा.पं.सदस्य उपस्थित झाले.परंतु सरपंच स्वप्ना संजय आंबटकर व ग्रामसेविका रश्मी कढाणे तसेच ग्रामसभा
घेण्यासाठी नेमलेले केंद्रप्रमुख कुऱ्हळकर हे अधिकारी मात्र ग्रामसभेला पोहचले नाही.त्यामूळे उपस्थित
ग्रा.पं.सदस्यांना ग्रामसभाघेण्याची विनंती केली.परंतु त्यांनी हात झटकले.मुनादी देऊन ठरविल्या प्रमाणे ग्रामसभा
न झाल्याने संतप्त ग्रामस्थानी सरपंचावर सर्व सदस्यांना अपात्र घोषीत करण्यात यावे यासाठी (ता.२)
चांदूर रेल्वे पंचायत समिती व तहसील कार्यालय गाठून मागण्याचे निवेदन दिले व दोषीविरूध्द कडक कारवाई
करण्याची मागणी गजानन मोहोड यांच्यासह निमगव्हाण ग्रामस्थांनी
रेटून धरली.
सरपंचा आंबटकर |