नांदेड मधील हिमायतनगरच्या आसूड सभेतून आ.बच्चू कडू यांचं श्री अशोक चव्हाणांवर टीकास्त्र
७० वर्षाच्या इतिहासात ज्याने घाम गाळला त्या शेतकऱ्याला आता आत्महत्या करावी लागतेय हि खेदाची बाब आहे. खरे पाहता अधिक मेहनत करणारा माझा शेतकरी, कामगार माणूस श्रीमंत व्हायला पाहिजे होता परंतु तो आजही गरीबच आहे. आणि सत्तेत येऊन केवळ बेईमानीने जगणारे माणसे अधिक श्रीमंत झाली आहेत. एकीकडे गरिबीने हिमायतनगर तालुक्यातील चव्हाण नामक शेतकऱ्यास पत्नीसह सहा मुलींच्या चिंतेने आत्महत्या करावी लागली. तर नांदेड जिल्ह्यातीलच दुसरा चव्हाण अति बेईमानीने कमावलेला पैसा कुठे ठेऊ म्हणून आदर्श घोटाळा करून प्रसिद्ध झाला आहे. असा निशाणा साधत आमदार बच्चू कडू यांनी हिमायतनगरच्या आसूड सभेच्या मंचावरून माजी मुख्यमंत्री तथा खा.श्री अशोक चव्हाणांवर जोरदार प्रहार केला आहे.