ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी जनलोकपाल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत पुन्हा मोठे जनआंदोलन उभारणार असल्याची घोषणा केली होती. लवकरच याबाबत स्थळ आणि वेळ जाहीर करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले होते. त्यानुसार, या आंदोलनाचा दिवस आणि ठिकाण निश्चित करण्यात आले असून पुढील वर्षी २३ मार्च २०१८ रोजी ‘शहीद दिनी’ दिल्लीत हे आंदोलन करणार असल्याचे हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे सांगितले.