दिड लाखाची कर्जमाफी नको तर सरसकट सातबारा कोरा हवा – श्री धनंजय मुंडे <><> हल्लाबोल पदयात्रेस सुरवात

0
813
Google search engine
Google search engine

यवतमाळ :-

यवतमाळ ते नागपूर हल्लाबोल पदयात्रेस आज यवतमाळ येथून सुरवात झाली. दिड लाखाची कर्जमाफी नको तर सरसकट सातबारा कोरा हवा. अशी मागणी यावेळी धनंजय मंडई यांनी केली

ज्या लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणूकीत महाराष्ट्रातील जनतेने भाजपला भरभरुन मतदान करून सत्तेवर आणले त्याच भाजप सरकारच्या काळात विदर्भात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करत आहेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने इथून हल्लाबोल आंदोलन सुरु केले आहे . या विदर्भाचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री, कृषीमंत्री आहेत. परंतु असे असताना याच विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत. म्हणून या विदर्भाच्या मातीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हल्लाबोल आंदोलन सुरु केले आहे. आमच्या शेतकऱ्यांना दीड लाखाची कर्जमाफी नको आमच्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी ही धनंजय मुंडे यांनी केली