अचलपूर:- उन्हाळ्याची सुरुवात अजून व्हायची आहे पण नगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षा मुळे रायपूरा परिसरात एका आठवड्यापासून पाणी टंचाई नागरिकांची समस्या बनली आहे.
अचलपूर नगरपालिका पाणीपुरवठा तसाही नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे.उन्हाळ्याची अजून सुरुवात व्हायची आहे तरीही रायपूरा निवासी पाणी टंचाई ला त्रस्त झाले आहे.गांधी पुल येथून मोठ्या पाईपलाईन मधून शिवसेना ओट्या पासून रायपूरा मुकूंद सुरंजे, मोतीराम हिंगे व दिनकर कुकर्डे यांच्या घराकडे जाणारी पाइपलाईन कोठेतरी बंद झालेली आहे त्यामुळे एक आठवड्यांपासून या परिसरातील नागरिकांना पिण्याचे व वापरण्याकरीता पाणी मिळत नाही.नगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी यांना याबाबत अनेक सुचना देवून ही त्यांनी याकडे लक्ष दिले नाही अखेर महेश सुरंजे,सुरेश क्षिरसागर,हिंमतराव कुकर्डे,विजय तिवलकर,सचिन पुरी,पांडुरंग तट्टे व येथील नागरिकांनी मुख्याधिकारी नगरपालिका अचलपूर यांना निवेदन देवून ही समस्या त्वरीत दूर करावी अशी मागणी केली आहे.