मुंबई :- चंद्रपूर जिल्हयातील सुप्रसिध्द धान संशोधक तथा एचएमटी या वाणाचे प्रणेते दादाजी खोब्रागडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली असून श्री. खोब्रागडे यांच्या निधनाने कृषी प्रगतीसाठी झटणारा एक प्रामाणिक संशोधक हरपला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात,
श्री. खोब्रागडे यांनी संशोधित केलेल्या धान वाणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होऊन धान शेतीत गुणात्मक सुधार झाला आहे. श्री खोब्रागडे हे खऱ्या अर्थाने मातीशी इमान राखणारे आणि तिचे ऋण फेडणारे संशोधक होते. राज्याचे कृषी क्षेत्र त्यांच्या योगदानाप्रती सदैव कृतज्ञ राहिल.