*सप्तम ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’चा समारोपीय दिवस*
तमिळनाडूमधील सद्य:स्थिती हिंदु धर्म आणि हिंदू यांच्या विरोधात आहे. सध्या तेथे ख्रिस्त्यांचा प्रभाव वाढत असून तो प्रभाव चर्चसह विविध गावे, राजकीय पक्ष आणि नेते यांवरही दिसून येतो. त्यामुळे तमिळनाडूमध्ये आलेल्या राम रथयात्रेला तेथील काही पक्ष आणि त्यांचे नेते यांनी विरोध केला. असे असूनही रथयात्रा यशस्वी झाली. सध्या तमिळनाडू हे ‘फॅसिस्ट’ राज्य झाले आहे. सध्या ‘तमिळी आणि हिंदू वेगळे आहेत’, असा चुकीचा समज पसरवण्याचे षड्यंत्र चालू आहे, असे प्रतिपादन हिंदु मक्कल कत्छीचे संस्थापक अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ यांनी केले.