२३ जूनला प्लॅस्टिक बंदी आली आणि कारवाई सुरु झाली, लोकांमध्ये संभ्रम आणि भय आहे. मला समजत नाही प्लॅस्टिकबद्दल कसली घाई होती? बंदीपूर्वी पुरेशी जनजागृती का केली गेली नाही?
महाराष्ट्रात प्लॅस्टिक बंदी झाल्यापासून मुख्यमंत्र्यांचं एकही विधान का नाही? हा निर्णय एका खात्याचा आहे का पूर्ण सरकारचा आहे? प्लॅस्टिकने संपूर्ण आयुष्य घेरलं गेलं आहे. मग बंदी करायची तर सगळ्याच प्लॅस्टिकवर का बंदी का नाही? असेही प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत