सार्वजनिक परिवहन सेवा, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवांना अडथळा नाही
मुंबई – आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. काल औरंगाबादमध्ये एका आंदोलक तरुणानं गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चानं आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रवींद्र पाटील यांनी ही माहिती दिली. मराठाक्रांतीमोर्चा तर्फे मुंबई, पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रात बंदची हाक – सार्वजनिक परिवहन सेवा, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवांना अडथळा येणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.