मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला लातूर मध्ये हिंसक वळण लागले आहे. आंदोलनस्थळी आलेले लातूर ग्रामीण मतदारसंघाचे काँग्रेस आमदार त्र्यंबक भिसे यांच्या गाडीवर जमावाने दगडफेक केली तसेच आमदारांना धक्काबुक्की केली. त्यामुळे येथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी भिसे यांना आंदोलन स्थळापासून सुरक्षित बाहेर काढले.रेनापुर फाटा येथे मराठा ठीय्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी भिसे हे आले असता आदोलकर्त्यांनी गोंधळ घातला. जमावाने त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. तर काही आंदोलकांनी आमदारांना आंदोलन स्थळापासून हुसकावून लावण्यासाठी जोरदार धक्काबुक्की केली. त्यामुळे रेनापुर फाटा येथे काहीकाळ तणावाचा वातावरण निर्माण झाले होते.