महाराष्ट्र राज्यात कुठेही एखाद्या पुरोगाम्याची हत्या झाली किंवा अन्य काही हिंदुत्ववादी कोणत्या प्रकरणात सापडले (अडकवले) की, लगेच कोणत्याही तपासाची औपचारिकता न ठेवता थेट या प्रकरणात सनातन संस्थेचे नाव घेतले जाते, लगेच सनातन संस्थेवर बंदीची मागणी केली जाते. या प्रकरणी राज्याचे गृहराज्यमंत्री श्री. दीपक केसरकर यांनी स्पष्ट सांगितले आहे की, सरकारने या प्रकरणी सनातन संस्थेचे नाव घेतलेले नाही. त्यांनी तीन व्यक्तींना अटक केली आहे, कोणत्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक केलेली नाही. तरीसुद्धा जाणीवपूर्वक सनातन संस्थेला लक्ष्य करून बंदीची मागणी काही उतावीळ राजकीय पक्षांच्या बेजबाबदार नेत्यांकडून केली जात आहे. एरव्ही संविधानाचा गजर करणारे नेते आता संविधानिक प्रक्रिया पूर्ण होण्यास का वाट पहात नाहीत ? त्यांचा लोकशाहीवरील विश्वास संपला आहे का ? प्रखर हिंदुत्वनिष्ठ सनातन संस्थेला संपवण्यासाठी सनातनवर बंदीची आवई उठवण्याचे धर्मविरोधकांचे कारस्थान आहे,असे सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सनातनवर बंदीची मागणी केली. दाभोलकरांच्या हत्येनंतर तासाभरात लगेच काँग्रेसी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोणताही तपास न करता यामागे उजव्या विचारसरणीचा हात असल्याचा आरोप केला आणि तपासयंत्रणांची दिशाभूल केली. त्यामुळे आज 5 वर्षे होत आली, तर खरे खुनी सापडत नाहीत. तोच प्रकार आता अशोक चव्हाण करत आहेत. हे अशोक चव्हाण हुतात्मा सैनिकांच्या टाळूवरील लोणी खाणार्या आदर्श घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहेत. मग काँग्रेस पक्षावर बंदी घालण्याची मागणी करावी का ? राष्ट्रवादीचे नवाब मलिक सनातनवर बंदीची मागणी करतात;ज्यांच्या पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड हे आतंकवादी इशरत जहांच्या घरी 2 लाख रुपयांची मदत देऊन येतात आणि तिच्या नावे अॅम्बुलन्स चालू करतात; ज्यांच्या आमदारांच्या आमदार निवासात आतंकवादी राहून जातात, ज्यांचा पक्षाचा महापौर मिरज दंगलीचा सूत्रधार आहे, अशी न संपणारी सूची असलेला (अ)राष्ट्रवादी पक्ष बंदी घालण्याच्याच पात्रतेचा आहे ! तरी अद्याप एकही आरोप सिद्ध झाला नसतांना सनातनवर बंदी घालण्याचा प्रश्न येतोच कुठे ? अर्थात् सनातनद्वेषाने पछाडलेल्या धर्मविरोधकांना सारासार विचार करण्याचाही विवेक शिल्लक राहिलेला नाही.
सनातन संस्था समस्त जनतेला आवाहन करत आहे की, कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका ! आजवर ईश्वराच्या कृपेमुळे, धर्माच्या अधिष्ठानामुळे आणि आपल्यासारख्या धर्मप्रेमी अन् राष्ट्रवादी समाजाच्या आधारावरच येथपर्यंत वाटचाल झाली आहे. ती अशीच ऐरावताप्रमाणे होत राहील, यात यत्किंचितही शंका बाळगू नका ! धर्माचे रक्षण करणार्याचे धर्म (ईश्वर) रक्षण करतो, या धर्मवचनानुसार सनातन या संकटातूनही तावून सुलाखून बाहेर पडेल, यावर श्रद्धा ठेवा, असे आवाहनही श्री. राजहंस यांनी केले आहे.