प्रखर हिंदुत्वनिष्ठ सनातन संस्थेला संपवण्यासाठी सनातनवर बंदीची आवई उठवण्याचे धर्मविरोधकांचे कारस्थान !

0
778
Google search engine
Google search engine

महाराष्ट्र राज्यात कुठेही एखाद्या पुरोगाम्याची हत्या झाली किंवा अन्य काही हिंदुत्ववादी कोणत्या प्रकरणात सापडले (अडकवलेकीलगेच कोणत्याही तपासाची औपचारिकता न ठेवता थेट या प्रकरणात सनातन संस्थेचे नाव घेतले जातेलगेच सनातन संस्थेवर बंदीची मागणी केली जातेया प्रकरणी राज्याचे गृहराज्यमंत्री श्रीदीपक केसरकर यांनी स्पष्ट सांगितले आहे कीसरकारने या प्रकरणी सनातन संस्थेचे नाव घेतलेले नाहीत्यांनी तीन व्यक्तींना अटक केली आहेकोणत्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक केलेली नाहीतरीसुद्धा जाणीवपूर्वक सनातन संस्थेला लक्ष्य करून बंदीची मागणी काही उतावीळ राजकीय पक्षांच्या बेजबाबदार नेत्यांकडून केली जात आहेएरव्ही संविधानाचा गजर करणारे नेते आता संविधानिक प्रक्रिया पूर्ण होण्यास का वाट पहात नाहीत त्यांचा लोकशाहीवरील विश्‍वास संपला आहे का प्रखर हिंदुत्वनिष्ठ सनातन संस्थेला संपवण्यासाठी सनातनवर बंदीची आवई उठवण्याचे धर्मविरोधकांचे कारस्थान आहे,असे सनातन संस्थेचे प्रवक्ते श्रीचेतन राजहंस यांनी म्हटले आहे.

    काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सनातनवर बंदीची मागणी केलीदाभोलकरांच्या हत्येनंतर तासाभरात लगेच काँग्रेसी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोणताही तपास न करता यामागे उजव्या विचारसरणीचा हात असल्याचा आरोप केला आणि तपासयंत्रणांची दिशाभूल केलीत्यामुळे आज 5 वर्षे होत आलीतर खरे खुनी सापडत नाहीततोच प्रकार आता अशोक चव्हाण करत आहेतहे अशोक चव्हाण हुतात्मा सैनिकांच्या टाळूवरील लोणी खाणार्‍या आदर्श घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहेतमग काँग्रेस पक्षावर बंदी घालण्याची मागणी करावी का राष्ट्रवादीचे नवाब मलिक सनातनवर बंदीची मागणी करतात;ज्यांच्या पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड हे आतंकवादी इशरत जहांच्या घरी 2 लाख रुपयांची मदत देऊन येतात आणि तिच्या नावे अ‍ॅम्बुलन्स चालू करतातज्यांच्या आमदारांच्या आमदार निवासात आतंकवादी राहून जातातज्यांचा पक्षाचा महापौर मिरज दंगलीचा सूत्रधार आहेअशी न संपणारी सूची असलेला ()राष्ट्रवादी पक्ष बंदी घालण्याच्याच पात्रतेचा आहे तरी अद्याप एकही आरोप सिद्ध झाला नसतांना सनातनवर बंदी घालण्याचा प्रश्‍न येतोच कुठे अर्थात् सनातनद्वेषाने पछाडलेल्या धर्मविरोधकांना सारासार विचार करण्याचाही विवेक शिल्लक राहिलेला नाही.

      सनातन संस्था समस्त जनतेला आवाहन करत आहे कीकोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका आजवर ईश्‍वराच्या कृपेमुळेधर्माच्या अधिष्ठानामुळे आणि आपल्यासारख्या धर्मप्रेमी अन् राष्ट्रवादी समाजाच्या आधारावरच येथपर्यंत वाटचाल झाली आहेती अशीच ऐरावताप्रमाणे होत राहीलयात यत्किंचितही शंका बाळगू नका धर्माचे रक्षण करणार्‍याचे धर्म (ईश्‍वररक्षण करतोया धर्मवचनानुसार सनातन या संकटातूनही तावून सुलाखून बाहेर पडेलयावर श्रद्धा ठेवाअसे आवाहनही श्रीराजहंस यांनी केले आहे.