आपतग्रस्तांना निलेश विश्वकर्मा यांच्याकडून आधार – वादळात घराचे नुकसान झालेल्या 40 कुटुंबांना ताडपत्र्यांचे वाटप

0
538
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे :- (शहेजाद खान) 
मागील आठवड्यात शहरासह तालुक्यातील अनेक भागात वादाळ झाल्याने अनेकांच्या घरावरचे छत उडाले होते त्या वेळी जय हिंद क्रीडा मंडळाचे अध्यक्ष व युवा नेतृत्व निलेश विश्वकर्मा यांनी त्वरित भेट देऊन आपतग्रस्तांचे दुःख समजून घेतले होते. त्यानंतर शासनाच्या मदतीची वाट न पाहता तातडीची मदत म्हणून 40 कुटुंबांना ताडपत्र्यांचे वाटप केले. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्या पासून बचाव करण्यास त्यांना मदत होणार आहे.
पावसासह आलेल्या वादळाने तालुक्यातील सोनगाव, कळमगाव, कळमजापूर, यासह शहरातील शिवाजी नगर परिसरातही या वादळाचा मोठा फटका बसला होता. अनेकांच्या घरावरील छत टिन पत्रे उडाले होते त्यावेळी अनेक लोकप्रतिनिधींनी भेटी दिल्यात परंतु निलेश विश्वकर्मा यांनी भेट देऊन त्यांना परिस्थितीशी सामना करता यावा यासाठी ताडपत्रांची वाटप करण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत प्रशांत बोबडे, केशव केने, बबलू भोयर, बिपीन देशमुख आदी उपस्थित होते. वाटप करण्यात आलेल्या कुटुंबात नसीर खा, मेहबुबखा, सैयद गोगा सैयद गुलाब, सैयद बशीर  गुलाब, जुबेदा सय्यद इब्राहिम, अफसर खा भिकन खा, रऊफखा रशिद खा, सय्यद जमीर सै अब्दुल, रशीद खान मिया खा, असलम खान हुसेन खा, अरबाज खान जब्बार खान, फिरोज भाई सय्यद, याकूब भाई, आदी आपतग्रस्तांना यावेळी ताडपत्रांचे वाटप करण्यात आले.