चांदूर रेल्वे – (Shaheajd Khan)
महाराष्ट्र शासनाने यावर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे राज्यभर सर्वत्र १ जुलैपासून वृक्षारोपण करण्यात येत आहे. त्यात लहान चिमुकलेही आपला वाढदिवस सुद्धा वृक्षारोपणाने व्हावा असा हट्ट आई-वडील यांच्याकडे धरत असल्यामुळे याच अनुषंगाने चांदूर रेल्वे शहरातील माळीपुरा येथील रहिवासी अजय उत्तमराव गावंडे यांनी आपला मुलगा चिन्मयचा पाचवा वाढदिवस सावंगी (मग्रापुर) रस्त्यावर वृक्षलागवड करून साजरा केला व इतरही पालकांनी आपल्या मुलाचा वाढदिवस सुद्धा वृक्षलागवड करून साजरा करावा असे मत यावेळी व्यक्त केले. तसेच सदर वृक्षांचे संगोपन सुद्धा करणार असल्याचा मानस गावंडे परिवाराने व्यक्त केला.
वृक्षारोपण कार्यक्रमाच्या वेळी चिन्मय चे आजोबा पत्रकार उत्तमराव गावंडे, आई नीलिमा गावंडे, रोशन भुसारी,पुष्पाबाई भुसारी, विलास ठाकरे, आयुष ठाकरे, नैतिक आखरे, आदिती ठाकरे, तन्मय घाटोळ, श्रावणी आखरे, श्रिजित मोंढे, सक्षम प्रमोद मेंढे, अनुष्का आखरे सह अनेक बाळगोपाळ हजर होते.