शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हे उद्या थेट परळी मार्गे बीड जिल्हात अवकाळी पावसाने झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी येत आहेत.दरम्यान,परळी येथील भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे समाधीस्थळ असलेल्या गोपीनाथगड येथे दर्शनासाठी येत आहेत.त्यामुळे,राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्कांना उधाण आले आहे.पंकजा मुंडे आणि उध्दव ठाकरे यांचे भावाबहिणीचे असलेले संबंध राज्याला सर्वक्षृत आहेत.त्यामुळे,सत्तास्थापनेचा घडामोडीच्या दरम्यान उध्दव ठाकरे हे गोपीनाथगडावर येत असल्यामुळे अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत आणि त्यास तसे वातावरण सुद्धा आहे
नेमके इथेच ठरणार का महायुतीची सूत्र , आशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे.