अकोटः ता. प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने शेतकरी शेतमजूर आक्रोश मोर्चा चे आयोजन शुक्रवार दिनांक २२ नोव्हेंबर सकाळी १२ वाजता करण्यात आले आहे. तरी हया मोर्चात वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा व तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शेतकरी शेतमजुरांनी तुते, रूमणे घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवक आघाडी अकोला जिल्हा उपाध्यक्ष समीर पठान यांनी केले आहे. मोर्चा गांधी जवाहर बाग बस स्टॅन्ड समोरून जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे पोहचेल तरी वंचित बहुजन आघाडी च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे.