नांदगाव खंडेश्वर/
शिवसेनेने तहसील कार्यालयावर धडक देऊन प्रचंड नारेबाजी केली तहसील परिसर दणाणून सोडला यावेळी शिवसेनेच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर करावा,पीक विमा लागू करावा, पी एम किसान योजने पासून वंचित असलेल्या व किरकोळ त्रुटी असलेल्या शेतकऱ्यांची शिबीर लावून त्यानं सदर योजनेचा लाभ देण्यात यावा हजारो लाभार्थी पंतप्रधान आवास योजनेपासून वंचित आहेत त्यांना तातडीने लाभ मिळावा इत्यादी मागणीचे निवेदन तहसीलदार यांना सादर करण्यात आले यावेळी शिवसेना, युवा सेना, महिला आघाडीचे शेकडो कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते