जनतेला कोरोना चे गांभीर्या नाही आहे. तालुक्यातील रोडवर पुन्हा लोकांची गर्दी ,तर अत्यावश्यक सेवा सोडून इतरहीदुकान  उघडे

0
920
Google search engine
Google search engine

जनतेला कोरोना चे गांभीर्या नाही आहे.
तालुक्यातील रोडवर पुन्हा लोकांची गर्दी ,तर अत्यावश्यक सेवा सोडून इतरहीदुकान  उघडे

चांदुर बाजार :-

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यु ला भरभरून प्रतिसाद मिळाला पण दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 23 मार्च ला चांदुर बाजार शहरातील रोडवर लोकांची गर्दी पाहायला मिळाली आणि ग्रामीण भागात सुद्धा जनतेने या कोरोना बाबत गांभीर्याने न घेतल्याचे दिसत आहे.

चांदुर बाजार येथील लपवून पान टपरी उघडल्या जात आहे तर जनता कर्फ्यु नंतर आज चांदुर बाजार येथे भाजीपाला मार्केट मध्ये नागरिकांनी एकच गर्दी केली होती.पोलीसानी जनतेला हकळण्याचा प्रयत्न केला पण याचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. तर चांदुर बाजार येथील अत्यावश्यक सेवा मध्ये तालुक्यातील सर्व मेडिकल दुकान उघडे असून सकाळी दूध डेअरी सुद्धा खुल्या होत्या.तर नागरिकांची ज्या प्रमाणात रोडवर गर्दी पाहायला मिळाली त्यावरून लोक गांभीर्याने घेत नसल्याचे दिसत आहे.

तर ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग हा आपले काम सुरळीत करत असून त्याचे शेतकरी वखरणी,फवारणी, आणि कापणी चे काम नेहमी पणे करीत आहे.