धरणात बुडून दोन सख्या बहिणींचा मृत्यू आंघोळ करताना खोल पाण्यात घसरला पाय

0
4062
Google search engine
Google search engine

धरणात बुडून दोन सख्या बहिणींचा मृत्यू
आंघोळ करताना खोल पाण्यात घसरला पाय

अमरावती /कार्यालय प्रतिनिधी

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील पथ्रोट नजीकच्या गोंडवाघोली गावाला लागुन असलेल्या भुलेश्वरी धरणात दोन सख्या बहीणींचा बुडून मृृत्यु झाल्याची दुर्देवी घटना घडली.

कुणबी वाघोली येथील रश्मीता राजेश बेलसरे वय १० वर्षे व कावेरी राजेश बेलसरे वय ८ वर्षे या दोघी बहीणी व दोन मावस बहीणी खेळत खेळत १२.३०वाजताच्या दरम्यान भुलेश्वरी धरणा वर पोहचल्या तीथे पाण्यात उतरुन आंघोळ करत असताना खोल पाण्यात पाय घसरुन पडल्याने दोघी बहिणींचा पाण्यात बुडुन दुर्दैवी मृृृृत्यु झाला. दोघी मात्र सुखरूप बचावल्या.या दोन्ही सख्या बहिणी
जि.प शाळा गोंडवाघोली शाळेच्या विद्यार्थीनी असल्याची माहीती आहे. पोलिसांनी दोनही मृतदेह धरणांतून काढून शवविच्छेदना करिता ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे