*’मजीप्रा’कडून माहिती*
अमरावती, दि. 23 : जिल्ह्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत देखभाल व दुरुस्ती करण्यात येत असलेल्या 156 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, तसेच 79 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत शहानूर जलशुद्धीकरण केंद्राच्या मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार आहे.
त्यामुळे अंजनगाव सुर्जी, दर्यापूर या शहरांसह या दोन्ही योजनांत समाविष्ट गावांचा पाणीपुरवठा 28 ते 30 सप्टेंबरदरम्यान (सोमवार ते बुधवार) बंद राहणार आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे जल व्यवस्थापन उपविभागीय अभियंता व्ही. टी. शेंडे यांनी कळवली आहे.
000