*प्रहार विद्यार्थी संघटना जिल्हाअध्यक्ष पदी आकाश खारोडे यांची निवड*

0
898
Google search engine
Google search engine

 

प्रतिनिधी:- अमरावती
प्रहार विद्यार्थी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी ना.बच्चु भाऊ कडु व छोटु महाराज वसु यांच्या हस्ते आकाश खारोडे यांची निवड करण्यात आली आहे.
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील आकाश खारोडे यांनी मागील 4 वर्षांपासून प्रहार विद्यार्थी संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव योगदान राहिले आहे. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षापासूनच त्यांनी सामाजिक व विद्यार्थी चळवळीत काम केले.विद्यापीठ स्तरावरील विद्यार्थ्यांचे प्रश्न असो की विद्यालय स्तरावरील प्रश्न असो त्यांनी सोडविण्यासाठी सदैव योगदान राहिले आहे. तसेच मागील त्यांच्या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना 2 ऑक्टोबर 2018 रोजी उपजिल्हा प्रमुख पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेऊन विद्यापीठावर आंदोलने, रक्तदान शिबीर तसेच प्रहारचे सक्रिय कार्यकर्ते राहिले आहे. प्रहार विद्यार्थी संघटना वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न, विद्यार्थ्यांसाठी दिलेली विविध निवेदने, केलेली अनेक आंदोलने,शाखा बांधनी, संघटन मजबूत करण्यासाठी नेहमी मोलाचे योगदान राहिले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी तळमळीने काम करून विद्यार्थी संघटना मजबूत करण्यासाठी नेहमी प्रयत्न केले आहेत. या सर्व कार्याची दखल घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक ना. बच्चु भाऊ कडु (राज्यमंत्री) व छोटु महाराज वसु (जिल्हाध्यक्ष) यांच्या हस्ते आकाश खारोडे यांची जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती पत्र देताना ना.बच्चु भाऊ कडु,छोटु महाराज वसु,शंभू भाऊ मालठाने तसेच जिल्ह्यातील प्रहारचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.