अमरावती :- मनसे कडून अमरावती ते औरंगाबाद शिवशाही चे औरंगाबाद लिहिलेले बोर्ड काढून छत्रपती संभाजीनगर असे केले

0
921
Google search engine
Google search engine

अमरावती :-

संभाजीनगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येत्या 26 जानेवारी पर्यंत राज्य सरकारने औरंगाबाद चे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामकरण करावे अशी मागणी केली आहे. राज्यभरातून मनसेच्या वतीने या मागणीला समर्थन दिले जात आहे याच पार्श्वभूमीवर आज या मागणीला आणखी बळ देण्याकरिता अमरावती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अमरावती बस स्थानक येथील अमरावती-औरंगाबाद शिवशाही बसचे बोर्ड काढून छत्रपती संभाजी नगर असे फलक लावले आणि छत्रपति संभाजी महाराज्यांच्या नावाने जयघोष करण्यात आला.
यावेळी महानगराध्यक्ष श्री संतोष बद्रे शहराध्यक्ष गौरव बांते शहरउपाध्यक्ष सचिन बावनेर, सुरेश चव्हाण,शहर सचिव पवन राठी , नितेश शर्मा,शहर सचिव निखिल बिजवे,रूद्र तिवारी विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष हर्षल ठाकरे, रोशन शिंदे,राम पाटील, वरदान इंगोले, सुरज बर्डे, शैलेश सूर्यवंशी, गौरव बेलुरकर श्याम पाटील, व्यंकटेश ईश्वर उज्वल फुटाने, संदीप भोयर मनिष दिक्षित,राजेश धोटे,आदि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.