संचारबंदीतील निर्बंधात अद्यापपर्यंत कुठलीही वाढ किंवा बदल झालेला नाही. तथापि, याबाबत धारणी येथील व्हाट्स अप ग्रुपवरही चुकीचे संदेश फिरत असल्याची तक्रार होत आहे.
याबाबत जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येते की, जिल्ह्यात संचारबंदीत कुठलाही बदल झाल्यास तसा निर्णय प्रशासनाद्वारे अधिकृतपणे जाहीर केला जाईल. त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये.
त्याचप्रमाणे, कुणीही चुकीचे संदेश पसरवून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये, अन्यथा कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात येत आहे.