गांधी जयंती पर्यंत रेल्वे गाड्यांना पूर्ववत थांबा द्या ; अन्यथा स्टेशन मास्तरांना कुलूप देणार भेट

0
1544
Google search engine
Google search engine

 

स्टेशन पूर्णत: बंद करून शहर आत्मनिर्भर करण्याची मागणी

रेल्वे स्टेशन मास्तर मार्फत यांच्यामार्फत रेल्वेमंत्र्यांना निवेदन

*चांदूर रेल्वे – 

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे स्टेशनवर रेल्वे गाड्यांना पुर्ववत थांबा देण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून असतांना याकडे रेल्वे विभागाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे त्रस्त नागरिकांनी मंगळवारी पुन्हा एक निवेदन स्टेशन मास्तर मार्फत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पाठविले असुन यात आगळीवेगळी मागणी करण्यात आली आहे. चांदूर रेल्वे स्टेशनवर कोरोना काळात बंद झालेले रेल्वे स्टॉपेज पूर्ववत महात्मा गांधी जयंती पर्यंत सुरु करावे अन्यथा २ ऑक्टोबरला स्टेशन मास्तरांना कुलूप भेट देऊन सदर स्टेशन बंद करण्याची मागणी स्थानिक रेल रोको कृती समितीतर्फे अध्यक्ष नितीन गवळी यांच्या नेतृत्वात करण्यात आली. असे झाल्यास चांदूर रेल्वे शहर रेल्वे सुविधांपासून देशातील पहिले आत्मनिर्भर शहर होणार असल्याचे रेल रोको कृती समितीने म्हटले आहे.