भातकुली न.पं.वर राणा दाम्पत्याचे वर्चस्व
काँग्रेस व भाजपाला जेमतेम यश
भातकुली नगरपंचायत निवडणुकीचे सर्व निकाल हाती आले आहे. 9 जागा जिंकून युवा स्वाभिमान पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवले असून सलग दुसऱ्यांदा सत्ता काबीज केली आहे. या निकालाने खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
बुधवारी सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू झाली. अवघ्या दीड तासात सतरा जागांचे निकाल हाती आले. त्यात युवा स्वाभिमान 9, शिवसेनेला 3, भाजपला 2, काँग्रेसला 1 व 2 जागा अपक्षांनी जिंकल्या आहे. येथेही भाजपाला अपेक्षेनुरूप यश मिळवता आले नाही. सोबतच काँग्रेसलाही चमक दाखविता आलेली नाही. शिवसेनेला गेल्या निवडणुकी इतकेच यश मिळाले आहे. युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे.