अमरावती : खल्लार पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या लेहगाव जवळ काल रात्रीच्या सुमारास आयशर ट्रक आणि टाटा एस वाहनाचा भीषण अपघात झाला आहे . या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेले सर्व जण एकाच कुटुंबातील असल्याची प्राथमिक माहिती. अपघातात सात जण गंभीर जखमी झाले आहे. तर टाटा एस मध्ये 12 प्रवासी प्रवास करीत होते.
विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक ने टाटा एस ला जबर धडक दिली.यात ५ जणाचा मृत्यू झाला जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे हलविण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती हलविण्यात आले आहे. यात लहान मुलाचा देखील समावेश आहे.