कडेगांव नगरपंचायतीने माझी माती माझा देश अभियान रॅलीचे केले उत्तम नियोजन…
सांगली/कडेगांव न्युज:
केंद्र सरकारचे ‘माझी माती- माझा देश’ अभियान येथील कडेगांव नगरपंचायत कार्यालयामार्फत राबविण्यात येत आहे. कडेगांव शहरातील माती कलश पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला दिल्ली येथे पाठविणार असल्याचे कडेगांव चे नगराध्यक्ष धनंजय देशमुख,मुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे यांनी सांगितले. या अभियान गाडीचे स्वागत योध्दा मंडळाचे संस्थापक आप्पासाहेब चव्हाण यांनी श्रीराम मंदीरा समोर श्रीफळ देऊन केले व सौ. प्रतिक्षा अभिषेक व्यास, गायत्री कुलकर्णी, वर्षा व्यास सायली कुलकर्णी, इत्यादी महीलांनी अमृतकलशात माती समर्पित केली यावेळी डॉ. एच एन व्यास, नगरसेवक निलेश लंगडे,अमोल डांगे,अकबर पटेल, विश्वास व्यास, आप्पासाहेब चव्हाण, अंकुशराव वरूडकर, अॅड राजेश कराडकर, अॅड. सुनिल कुलकर्णी, चैतन्य पाठक उपस्थीत होते
या अभियानांतर्गत कडेगांव नगरपंचायतीने शहरातून अमृत कलशात
समर्पित केलेली माती एका कलशामध्ये गोळा करून नगरपंचायतीने तो अमृत कलश सांगली जिल्हा परिषदेकडे सुपुर्द केला.