सांगली जिल्ह्याचा बुलंद आवाज खानापुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिलभाऊ बाबर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या निधनाने खानापूर विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यावर व महाराष्ट्रातील राजकारणावर शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते निष्ठावंत व कट्टर समर्थक होते. त्यांच्या कारकिर्दीत अनेक योजनांना गती मिळाली. तसेच त्यांनी विशेष योजनाही मंजूर करून मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मोठा हातभार लावला. टेंभू योजनेच्या सफलतेतील त्यांच्या महत्त्वाच्या सहभागामुळे त्यांना पाणीदार आमदार म्हणून ओळखले जात होते.