आषाढी वारीतील गोपाळकाल्यासाठी गोपाळपूर येथे ज्ञानेश्वर माऊली तुकाराम या जयघोषात सर्व संतांच्या पालख्या दाखल झाल्या. गोपाळ काला गोड झाला। गोपाळाने गोड केला ॥ या गजरात वारकरी, भाविकांनी गोपाळकाला केला.
संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संत सोपानकाका, संत नामदेव, संत मुक्ताबाई, संत एकनाथ, संत निवृत्तीनाथ यांच्या पालख्यासह अन्य संतांच्या पालखीचे गोपाळपुरात आगमनझाल्यानंतर व पालखी विसावल्यानंतर गोपाळपूर येथे पालख्यांचे स्वागत व पूजा करण्यात आली