पदविधर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर मंत्रालयात चर्चा

0
1532
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे  / शहेजाद खान –

पदविधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचा १७ वर्षापासून प्रलंबित असलेल्या नियुक्तीचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता असून, याबाबत मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याची माहिती संघटनेच्या प्रदेश अध्यक्षा रेखा अहिरराव यांनी दिली.

मुंबई मंत्रालयात किमान कौशल्य विकास खात्याचे प्रधान सचिव यांच्यासोबत भेट व चर्चा झाली. चर्चेनंतर लवकरच कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन शासन निर्णय देवू असे त्यांनी सांगितले. प्रदीर्घ चर्चेनंतर आता कर्मचाऱ्यांना नियुक्तीचा प्रश्न लवकरच निकाली निघणार असल्याचा विश्वास संघटनेच्या प्रदेश अध्यक्षा अहिरराव यांनी व्यक्त केला. यावेळी संघटनेचे प्रदेश सचिव मिलिंद भोले, प्रदेश उपाध्यक्ष अब्दुल सईद, विदर्भ प्रमुख ललीता क्षीरसागर उपस्थित होत्या. अंशकालीन कर्मचाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष व विदर्भ प्रमुख ललीता क्षिरसागर यांच्या संपर्कात राहण्याचे आवाहन हेमंत तायडे, सुरेश ठाकरे, अचल म्हसतकर, अजय मोहोड, ललीता भोगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.