सनातनच्या आश्रमात घुसून डॉ. आठवले यांचा खून करण्याची भाषा ही जेम्स अण्णामलाई यांची आतंकवादी मनोवृत्ती दर्शवते, तसेच आश्रमातील सर्व मुलींवर बलात्कार करण्याची भाषा ही त्यांच्यातील विकृत मानसिकताच दर्शवते. ते स्वामी विवेकानंद यांना ‘वेश्यापुत्र’ संबोधून हिंदु धर्म आणि स्वामी विवेकानंद यांविषयी पराकोटीचा द्वेष प्रगट करत आहेत. भारतात ख्रिश्चॅनिटी स्थापित करण्याचा त्यांचा उद्देश ही त्यांची धर्मांधता आहे. त्यामुळे अशी व्यक्ती समाजहिताला अत्यंत घातक असून तिच्यावर त्वरित कारवाई व्हायला हवी, अशी मागणी आहे.
‘गोवा येथे २५ डिसेंबरपासून नाताळ सणाला मोठ्या प्रमाणात आरंभ होत आहे. त्याच्या आधी असे धमकीचे पत्र हिंदुत्वनिष्ठ सनातन संस्थेच्या आश्रमाला ख्रिस्त्यांकडून येते, हे कृत्य गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडवणारे आहे’, अशी प्रतिक्रिया श्री. राजहंस यांनी दिली.
या पत्राच्या संदर्भात सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली असून या धर्मांध ख्रिस्ती व्यक्तीच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.