अचलपूर नरहरी महाराज संस्थान येथे पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन- प्रमुख पाहुणे म्हणून आमदार रवी राणा यांची उपस्थिती

0
1456
Google search engine
Google search engine

अचलपूर:-

श्री नरहरी सोनार संघ अचलपूर तसेच सर्व शाखीय सुवर्णकार समाज अचलपूर यांचे संयुक्त विद्यमाने अभिनव काँलनी संत शिरोमणी नरहरी महाराज सभागृहात दरवर्षी प्रमाणे माघ कृ.3,शके 1939 रविवार 4 फेब्रुवारी ला पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी रांगोळी स्पर्धेचे आयोजन वर्षाताई हिरूळकर यांनी केले तर काल्याचे कीर्तन ह.भ.प.रामदासजी चेडे महाराज करणार आहेत.मान्यवरांचा,समाजातील जेष्ठ नागरिकांचा तसेच प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बडनेरा मतदार संघाचे आमदार रवि राणा,नवनित राणा,माधवराव आसरे माजी अध्यक्ष जिल्हा माळवी समाज व सदस्य हरिभाऊ विंचूरकर उपस्थित राहणार आहेत असे आयोजकांनी सांगितले तसेच संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या कार्याविषयी माहिती देतांना त्यांनी सांगितले की महाराजांनी वारकरी संप्रदायामध्ये विविध जाती जमातीच्या संतांची एकत्र येऊन वारकरी संप्रदाय वाढविण्याचा प्रयत्न अठरा प्रगट जाती जमातीच्या संतानी केला आहे. यात पंढरपूर मधील संत नरहरी सोनार यांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमठविला होता. संत नरहरी सोनार हे जातीने सोनार असल्याने त्यांचा व्यवसाय हा दागिन्यांचा होता. त्यांची कलाकुसर त्यावेळेस चांगली प्रसिद्धी होती. आपल्या कलेच्या जोरावर व्यवसायाचा पंढरपुरात चांगला जम बसविला होता. संत नरहरी सोनार हे एक प्रसिद्ध शिव भक्त होते. त्यांच्या घरात शिवभक्ती परंपरेने चालत आली होती. त्यांची भगवान शंकरावर एकनिष्ठ भक्ती होती. त्यांच्या या भक्तीची चर्चा पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर होती. रोज सकाळी उठल्यावर ते शिव आराधना करीत असत. रोज पहाटे जोतिर्लिंगावर ते बेल पत्र वाहत असत.ते शिवभक्त असले तरी दुस-या देवावर त्यांची फारशी श्रध्दा नव्हती यामुळे काही जणांना त्यांच्या या वृत्तीचा राग येत असे. एके दिवशी पांडुरंगाने या भक्ताची परीक्षा घेण्याचे ठरविले. तेव्हाच गावात एका सावकाराला पुत्र झाला तेव्हा पांडूरंगला कमरेची सोन साखळी तयार करावी असे त्या सावकाराच्या मनात आले. विठ्ठलाला नवस केल्यामुळे त्याला पुत्ररत्न झाले होते. संत नरहरी सोनार हे उत्तम कारागीर असल्याने त्यांनीच ती सोनसाखळी बनवावी म्हणून ते त्यांच्याकडे साखळी बनविण्यास सांगितले. पण संत नरहरी सोनार ह्यांनी स्पष्टपणे नकार दिला याचे कारण त्यांचा पण होता की शंकाराशिवाय इतर कोणत्याही देवतांचे मुख ते बघणार नाहीत. त्यावर निरुपाय म्हणून सावकारांनीच विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून देण्याचे ठरवले. यावर संत नरहरी सोनार यांनी साखळी बनवण्यास होकार दिला. दुस-या दिवशी सावकारांनी विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून दिले. संत नरहरी यांनी आपल्या कलेप्रमाणे सुंदर सोनसाखळी तयार केली. सावकार देखील सोनसाखळी पाहून खुश झाला. मंदिरात जाऊन विठ्ठलाला सोन साखळी घातली पण ती एक वीतभर जास्त झाली होती म्हणून सावकाराने आपल्या सेवकाला संत नरहरी सोनार याच्याकडे पाठविले व साखळीचे माप बरोबर करून आणण्यास सागितले. संत नरहरी सोनार यांनी साखळीचे माप त्याप्रमाने करून दिले. परंतु विठठलाला साखली घातल्यावर पुन्हा माप जास्त झाले यामुळे नरहरी सोनार गोंधळून गेले. माप बरोबर देऊनही असे कसे होत आहे या विचारात ते पडले शेवटी स्वतः मंदिरात गेले. स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून विठ्ठलाच्या मूर्तीसमोर गेले व सोन साखळी कमरेत घालू लागले तर त्यांच्या हाताला व्याघ्र चर्मे लागली. सोनारांचे हात गळयापर्यंत गेले तर त्यांना गळ्यात शेष नाग असल्याचे जाणविले. नरहरी सोनारांनी लगेच आपल्या डोळ्यावरील पट्टी काढली बघतात तर काय समोर विठ्ठलाचीच मूर्ती होती. पुन्हा त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली परत पुन्हा तेच. यामुळे ते खूपच गोधळून गेले. शेवटी त्यांच्या लक्षात आले की पांडुरंग परमात्माच शंकर भगवान आहे. हे सर्व देव विठ्ठलातच सामावलेले आहे. यानंतर ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये बुडून गेले व पांडूरंगला म्हणाले.कार्यक्रमाचा समारोप महाप्रसाद व नंदीनी शेरेकर यांचे आयोजनात महिलांच्या हळदी कुंकु च्या कार्यक्रमाने होणार असून समाज बंधू भगिनींनी व नागरिकांनी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आयोजन समितीने आवाहन केले आहे.