अमरावती – शोपियां जिल्ह्यात दगडफेक करणार्या तरुणांना पांगवण्यासाठी सैन्याने केलेल्या गोळीबारात २ जणांचा मृत्यू झाल्याने थेट सैनिकांच्याच विरोधात भाजपा – पीडीपी सरकारने फौजदारी गुन्हा नोंद केल्याचा धक्कादायक प्रकार २७ जानेवारी या दिवशी घडला.याबाबत सरकारमध्ये मित्र पक्ष म्हणून सहभागी असलेल्या शिवसेनेन शहरात ठिकठिकाणी फलक लाऊन भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडल आहे त्यात त्यांनी म्हटलं आहे कि
आता लाज कसली बाळगायची आणि अभिमान कसला ? भाजपा सरकारचा राष्ट्रभक्तीचा नवीन प्रताप ! भारतीय लष्करच गुन्हेगार असा मजकूर लिहिण्यात आला आहे. एसटी महामंडळ जाहीर करीत आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे “शहीद सन्मान योजना” शहिदांचा वारसांना नौकरी व पत्नीस मोफत प्रवास व सोबतच फलकावर मंत्री श्री दिवाकर रावते यांचा फोटो सुद्धा लावला आहे.