अमरावती :-
अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथील पुरग्रस्त यांच्या वस्तीला अचानक आग लागली अनेकांची घर संपूर्ण उध्वस्त झाली,जनावर देखील मरण पावली.
ज्या लोकांची घरे जळली ती सगळी कुटुंब जेमतेम परिस्थितील,शासनाची मदत देखील थोडी तोडकी मिळणार अनेकांनी बरीच मदत केली होती सामाजिक भावना मनात घेऊन लढा संघटनेने वलगाव आगग्रस्तांसाठी अमरावती करांना मदतीचे आव्हान केले होते त्या करीता गाडगे महाराज यांच्या समाधी मंदिरात संकलन केंद्र देखील सुरू केले होते. ४५ डिग्री च्या तपमात लढा कार्यकरते हजर राहिले आणि तेवढ्याच तपमानात अमरावतीकरांनी देखील मदत पोहचवली.
अनेकांनी कपड्या सहीत आर्थिक मदत व धान्य दिले.
त्याच सर्वांच्या आर्थिक मदतीतून आज ब्लॅंकेट आणी सतरंजी वाटप केल्या गेले
जमा झालेले धान्य लगेच वलगाव वाटप करणार आहो आणि कपडे मेळघाटात वाटप करणार आहो.अशी माहिती संघटनेने दिली आहे
साहित्य वाटप करतांना योगेश किल्लोर,प्रीतम भटकर (माजी जी प सदस्य) राजेश साबळे,जयेश मोरे,अमित चवरे, गजु मोरे,अंकुश गायकवाड, संदीप राघोर्ते आणि संजय भाऊ देशमुख माजी जी प सदस्य तथा अध्यक्ष लढा संघटना हे हजर होते.