मालेगाव बॉम्बस्फोट प्रकारण लवकर निकाली काढा : श्री समीर कुलकर्णी यांची मागणी

0
546
Google search engine
Google search engine

पुणे : मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणाला 11 वर्षे झाली आहे अद्याप या प्रकरणाचा निकाल का लागला नाही, असा प्रश्न या प्रकरणातील सह आरोपी श्री समीर कुलकर्णी यांनी उपस्थित करत प्रकरणाची दररोज सुनावणी घेऊन हा खटला लवकर निकाली काढण्याची मागणी केली

सन 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकारणाचा खटला गेली 11 वर्ष सुरू असून त्याचा निकाल अद्याप लागलेला नाही. निकाल लवकर लागू नये यासाठी सह आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांचे वकील वेगवेगळी कारणे देत प्रकरणाची सुनावणी लांबवत असल्याचाही आरोप त्यांनी केला. यामुळे या प्रकरणातील निर्दोष लोकांनाही मरण यातना सहन कराव्या लागत आहे.