चांदुर बाजार तालुक्यात सर्रास अवैध धंदे सुरू, गावठी दारू,वरली मटका,अवैध गौण खनिज,गुटखा ची तस्करी जोरात सुरू

0
1633
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार तालुक्यात सर्रास अवैध धंदे सुरू,

गावठी दारू,वरली मटका,अवैध गौण खनिज,गुटखा ची तस्करी जोरात सुरू

चांदुर बाजार:-

गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या चांदुर बाजार पोलीस स्टेशनचा पदभार पोलीस निरीक्षक उदयसिग साळूके यांनी स्वीकारला खरा परंतु शहरातील गुन्हेगारीचे सत्र थांबतांना दिसत नाही. तालुक्यात खुलेआम अवैध धंदे जोरात चालू आहेत. पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावरच मटका, जुगार चालु असतानाही पोलीस याकडे ‘अर्थ’ पूर्ण दुर्लक्ष करत आहेत.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे, दहशत, वाळू तस्करी, गावठी कट्टे ,अवैध पणे गुटखा विक्री या माध्यमातून टोळी युद्ध सुरू आहे. पोलीस आंधळ्य़ाची भूमिका घेत असल्याने या परिसरात खुलेआम अवैध धंदे सुरू आहेत. दारू, गांजा, मटका, जुगार असे अनेक अवैध धंदे बिट अंमलदारांच्या आशीर्वादाने सुरू आहेत. गल्लीबोळात सुरू असलेले जुगाराचे अड्डे, अवैध वाळू तस्करी,अवैध गुटखा विक्री. या वाढलेल्या अवैध धंद्यांच्या पैशातूनच शहरात हाणामारीचे प्रकार वाढले आहेत. या सर्व प्रकारांकडे पोलीस दुर्लक्ष करत आहेत. तसेच शहरात गुन्हेगारी घटना घडत आहेत;

शहरातील वाढती गुन्हेगारी आणि गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस वेगवेगळ्या उपाययोजना करत असतात. असे असले तरी शहरातील रात्रीच्या वेळी घडणार्‍या गुन्ह्यांचा आकडा मात्र कमी होताना दिसत नाही. रात्रीच्या काळोखात शहरात तसेच ग्रामीण भागात गुन्हेगारांचाच सुळसुळाट सुरू आहे.रात्रीची गुन्हेगारी कमी करण्याचे एक आव्हान पोलीसांसमोर उभे ठेकले आहे. निरीक्षक पदावर नूतन पोलीस विभाग च्या या कार्यभार मुळे वाढत्या गुन्हेगारी मुळे वरिष्ठ अधिकारी त्यांची डोकेदुखी वाढली असेल यात शंका नाही, परंतु या परिस्थितीतून मार्ग काढून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याचे मोठे आव्हान स्थानिक पोलिस त्यांच्यासमोर आहे.

तालुक्‍यातील वाढती गुन्हेगारी डोके वर काढत आहे. मात्र, केवळ किरकोळ कारवाई करून स्वत:ची पाठ थोपटून घेणाऱ्या पोलीसांकडून गुन्हे रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.

तालुक्‍यात गुन्हेगारीचे मोठे जाळे पसरत चालले आहे. लूटमार, मारामाऱ्या, चोऱ्या या घटनांमुळे अधिक बेजार झालेल्या नागरिकांना आता खून, दरोडा याची धास्ती वाटू लागली आहे. तालुक्‍यातील वातावरण दूषित होत आहे. राजकीय वैमनस्य आणि आर्थिक लाभापोटी गुन्ह्याचे प्रमाण अधिकच वाढत असल्याचे बोलले जाते.नव्या अधिकाऱ्यांना गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान असतानाच स्थानिक गुन्हेगारांना काबूत ठेवण्यासाठी शक्ती खर्च करावी लागणार आहे. सट्टा, चोरी, जुगार, मटका, रोड रोमिओ, लुटमार, अवैध वाहतूक, बेकायदा दारू विक्री यांसारख्या कायद्याच्या तुलनेत लहानसहान गुन्ह्य़ांप्रमाणेच अलिकडच्या काळात झालेली वाढ तसेच गटांमध्ये होणारी धुसफूस ते गंभीर हाणामाऱ्या, खून, दरोडे, वाढता सायबर क्राईम या बाबत अलर्ट राहावे लागणार आहे. अवैध धंद्यांपासून केवळ शहरच तालुक्यातील चारही पोलीस स्टेशन सुटले नाही तर तालुक्यातही त्या पोलीस स्टेशन हद्दीत बिनदिक्कतपणे मटका, जुगार खेळला जात आहे.

तालुक्यातील आसेगाव,शिरजगाव कसबा,ब्राम्हणवाडा थडी,चांदुर बाजार पोलीस स्टेशन हहद्दीतील भागात सध्या हा व्यवसाय जोमात सुरू आहे. विशेष म्हणजे त्या त्या भागातील पोलीस अधिकारी, बीट जमादार यांना मॅनेज करून हा व्यवसाय राजरोसपणे चालविला जातो. खुलेआम हा व्यवसाय चालत असल्याने गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून चोर्‍याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अकोला पालकमंत्री आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या तालुक्यातील गुंडगिरी थोपविण्याची जबाबदारी पेलण्याचे दिव्य नवीन अधिकाऱ्यांच्या समोर आहे.