लॉक डाऊन च्या एक महिन्यात शहर वाहतूक शाखेची जम्बो कारवाई 15 हजार वाहनांवर दंडात्मक कारवाई,600 वाहने जप्त

0
586
Google search engine
Google search engine

अकोलाःकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 15 एप्रिल पासून संपूर्ण महाराष्ट्रात लॉक डाऊन जारी केला, त्या अनुषणगाने अकोला जिल्हाधिकारी ह्यांनी अकोला शहर व जिल्ह्यात काही मार्गदर्शक तत्वे जारी करून कडक लोकडाऊन लागू केला, लॉक डाऊन व संचारबंदी ची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर ह्यांनी सर्व पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी व शहर वाहतूक शाखेला दिले, निर्देश प्राप्त होताच पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी लॉक डाऊन मध्ये विनाकारण फिरणारे व जवळ वैध कागदपत्रे न बाळगणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली व विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकांची वाहने सरळ जप्त करून त्यांचे विरुद्ध अकोला शहरातील विविध पोलीस स्टेशन मध्ये दखल पात्र गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावला

15 एप्रिल ते 15 मे ह्या एक महिन्याचे कालावधी मध्ये शहर वाहतूक शाखेने धडक कारवाई करून एकूण 14,753 वाहनांवर दंडात्मक कारवाई करून त्यांचे कडून 8,15,400 रुपयांचा दंड वसूल केला तसेच संचारबंदीचा भंग करून कोणतेही सबळ कारण नसतांना फिरतांना आढळून आलेल्या एकूण 586 वाहन चालकांची वाहने जप्त करून त्यांची वाहने शहरातील विविध पोलीस स्टेशन मध्ये लावून त्यांचे विरुद्ध दखल पात्र गुन्हे दाखल केले, लॉक डाऊन संपे पर्यंत त्यांची वाहने सोडण्यात येणार नाहीत।

सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे निर्देशा प्रमाणे व अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत ,उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम ह्यांचे मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके, पोलीस उपनिरीक्षक सुरेश वाघ व वाहतूक पोलिसांनी केली।
जिल्हाप्रशासनाने जारी केलेल्या निर्देशाचा भंग करणाऱ्या वाहन चालकां विरुद्ध धडक कारवाई सुरूच राहणार असल्याने नागरिकांनी विनाकारण फिरणे टाळावे व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी केले आहे।