*जैनपुर ते आखतवाडा रस्त्याची दुर्दशा; रस्ता डांबरीकरणाची गावकऱ्यांची मागणी.*

0
622
Google search engine
Google search engine

जिल्हा प्रतिनिधी:
चांदुर बाजार तालुक्यातील पोस्ट खराळा असलेल्या जैनपुर गावातील नागरिकांना येण्याजाण्यासाठी आखतवाडा व्हाया चांदुर बाजार येथे जावे लागते. उन्हाळ्यात खडीकरण करून त्याचे त्वरित डांबरीकरण करून अपेक्षित होते. ग्रामपंचायत ठराव घेऊन शासनाच्या दरबारी रस्ता डांबरीकरणाचा आग्रह धरला. विद्यमान आमदार #बच्चु_कडु यांनी या गावाला भेट दिली. आश्वासन दिले परंतु अवघ्या चांदुर बाजार तालुक्यापासुन ८ किमी अंतरावर असलेले ५०० ते ६०० लोकसंख्या असलेल्या #जैनपुर गावातील लोकांना पक्का रस्ता मिळाला नाही. पावसाळा सुरू झाल्याने रस्ता पुर्णपणे खड्ड्यात रुपांतरित झाला आहे. गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याची गंभीरता लक्षात घेऊन तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी आजाद समाज पार्टी चे विदर्भ संघटक तथा अमरावती जिल्हा प्रभारी किरण गुडधे यांनी केली आहे.