एकमेकांवरील हल्ला प्रकरणातील आरोपींचा जमानत अर्ज नामंजूर
अकोट प्रतिनिधी :येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री मनिष गणोरकर यांनी ग्राम रोहणा येथील जागेच्या वादातून एकमेकांवर झालेला हल्ला प्रकरणातील आरोपींचा जमानत अर्ज नामंजूर केला.दि.६/१०/२० रोजी दहीहांडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रोहाणा येथे जुन्या जागेच्या वादातुन हाणामारी झाली होती. याप्रकरणी सरकारी वकील एड.अजित देशमुख यांनी युक्तिवाद केला त्यांना अटकपूर्व जामीन दिल्यास ते पुन्हा गावात गंभीर गुन्हा करण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच साक्षीदारांवर दबाव आणू शकतात दोन्हीकडील आरोपींनी हातात कायदा घेऊन गंभीर गुन्हा केल्याने त्यांना पोलीस कस्टडी मध्ये ठेवणे योग्य राहील नाहीतर त्यांना कायद्याचा धाक राहणार नाही असा युक्तिवाद न्यायालयाने ऐकल्यानंतर विद्यमान आरोपींचा जामीन अर्ज नामंजूर केला.